प्रतिनिधी / म्हैसूर
राज्यात कोरोनावरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. काँग्रेसने कोरोनावरून वारंवार भाजप सरकारला धारेवर धरलं आहे. दरम्यान काँग्रेसने म्हैसूरच्या कोरोना परिस्थितीला जिल्हा प्रभारी मंत्री एस. टी. सोमशेखर जबादार असल्याचे म्हंटले आहे. या आरोपानंतर मंत्री सोमशेखर यांनी शनिवारी, जर म्हैसूर राजीनामा देऊन कोविडमुक्त होणार असेल तर मी आपल्या मंत्रीपदासाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे म्हंटले आहे.
दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी मंत्री सोमशेखर म्हैसूरमधील कोरोना परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात अपयशी ठरल्याचे म्हंटले आहे. कॉंग्रेस पक्षाच्या आरोपाला उत्तर देताना सोमशेखर म्हणाले की, जर माझ्या राजीनाम्याने म्हैसूर कोरोनामुक्त होणार असेल तर आपण मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार आहोत. तसेच कोविडवर एक व्यक्ती नियंत्रण ठेवू शकत नाही. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येकजण त्या दिशेने कार्य करीत आहे,” असे ते म्हणाले.