प्रतिनिधी / काणकोण
काणकोण-कारवार मार्गावरील माड्डीतळप येथील धोकादायक वळणावर 1 रोजी मध्यरात्री एका मालवाहू वाहनाने पलटी खाऊन रस्त्यापासून 15 मीटर अंतरावर सदर वाहन जाऊन पडले. यात चालक गंभीर जखमी झाला आहे.
काणकोणच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वरी येथून सदाशिवगड येथे फरशा घेऊन आलेले हे वाहन सदर वळणावर पोहोचल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा गेल्यामुळे हा अपघात घडला. पलटी खाऊन 15 मीटरपर्यंत गेलेल्या सदर मालवाहू वाहनाची पुढची चाके तुटून पडली आहेत. या वळणावर दिशादर्शक फलक नसून पुरेशी दिव्यांची सोय नाही. आतापर्यंत या वळणावर 10 ते 12 वाहने अपघातग्रस्त झालेली असून दोघांचा मृत्यूही झालेला आहे. या रस्त्यावर वाहनाच्या गतीवर नियंत्रण ठेवण्याचा संदेश देणारे त्याचप्रमाणे अपघातप्रवण क्षेत्र असल्याचा इशारा देणारे फलक लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.