प्रतिनिधी / सातारा
माणदेशी फाउंडेशन आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विध्यमाने ग्रामीण भागातील महिला उधोजीकाना कर्ज वाटप प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडल्याची माहिती पत्रकार परिषदेत माणदेशी फाउंडेशनच्या श्रीमती चेतना सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्या म्हणाल्या, लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्व उधोगाना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले आहे.महिला उधोजीकानाही या परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना कमी व्याजदरात तसेच नॅशनलाईज बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी माणदेशी फाऊंडेशन आणि स्टेट बँक ऑफ इंडिया एकत्र आले आहेत.महिलांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनवण्यासाठी आर्थिक साक्षरता , उधोजीका व्यवसाय प्रशिक्षण हे प्रकल्प राबविण्यात येत आहेत.कर्ज घेताना कोठून घ्यावे, त्याचा व्याजदर पहाणे आदी ब्रयाच गोष्टी पहाव्या लागतात.मला आनंद वाटतो आहे की एस बी आय सारखी बँक आमच्या महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी पुढे आली.एवढेच नव्हे तर महिला उधोजीकाना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी स्टेट बँकेने त्यांच्या फायद्याचा विचार न करता उदात्त हेतूने पाऊल उचललं आहे.याबद्दल स्टेट बँकेची मी आभार मानते, असे त्यांनी सांगितले.