दहिवडी / प्रतिनिधी :
माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंच वार्षिक निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले गेले असून, 13 जागांसाठी 103 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तोट्यात सुरू असणाऱ्या बाजार समितीसाठी एवढी चुरस का? असा प्रश्न उपस्थित होत असून, निवडणुकीत कोट्यवधींचा चुराडा होणार असल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शेखर गोरे गट व अनिल देसाई गट अशा चार गटांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केले आहेत. सोसायटी मतदारसंघ निवडणुकांतील 11 जागांसाठी 62 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील सर्वसाधारण गटासाठीच्या 7 जागांसाठी 42 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
महिला प्रवर्गाच्या 2 जागांसाठी 8 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. इतर मागास प्रवर्गातील एका जागेसाठी 6 अर्ज दाखल झाले आहेत. विमुक्त जाती भटक्या जमाती साठी एक जागा असून 6 अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातून चार उमेदवार निवडून द्यावयाचे असून, त्यासाठी 25 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी सर्वसाधारण मतदारसंघातील दोन जागांसाठी 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अनुसुचित जाती जमातीच्या एका जागेसाठी सहा अर्ज दाखल झाले आहेत.आर्थिक दुर्बल घटकतून एका जागेसाठी सहा अर्ज दाखल झाले आहेत. व्यापारी मतदार संघातून दोन जागेसाठी 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. हमाल मापाडी मतदार संघातून एका जागेसाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, असे एकूण आज 103 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सहाय्यक निबंधक विजया बाबर यांनी याबत माहिती दिली.
माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 2065 मतदार मतदान करणार आहेत. माण बाजार समितीमध्ये कोणतेही व्यवहार होत नाहीत. शेतकऱ्यांसाठी कोणताही माल विकण्याची येथे सुविधा नाही.