पेंडुर-सातवायंगणी येथील घटना
पुलाचे काम करताना परप्रांतीय कामगारांवर काळाचा घाला
वेंगुर्ले/वार्ताहर-
पेंडुर-सातवायंगणी येथील पुलाच्या पायाचे काम पूर्णlवास आल्यानंतर तेथील स्लँबच्या फाडय़ा काढताना मातीचा ढिगारा कोसळून कर्नाटक यादगीर येथील गोपीलाल रामू राठोड (52) व ओमप्रकाश तेजूनायक राठोड (32) अशा दोन कामगारांचा मृत्यू झाला. हि घटना शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी वेंगुर्ले पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे. कना&टक यादगीर येथील हे दोन्ही कामगार पेbडुर सातवायंगणी येथील पुलाच्या कामांसाठी आले होते. सध्या पुलाच्या कामानिमित्त पेंडुर येथे काम करीत असलेल्या ठिकाणापासून सुमारे 100 मीटर अंतरावर झोपडय़ा बाbधून या कामासाठी 24 कामगार राहत होते. पेंडुर येथील पुलाच्या पायाचे बाbधकाम पूर्णlवास आले होते.
शनिवारी सकाळी रामू राठोड, रमेश चव्हाण, गोपीनाथ रामू राठोड, ओमप्रकाश तेजूनायक राठोड हे चारजण हे पुलाचे काम करण्यासाठी गेले होते. अन्य कामगार झोपडीत थांबले होते. या कामावर मुकादम म्हणून रिमू रिठोड हा होता. त्याने पुलाचे बांधकाम करण्यासाठी संरक्षण भिंत घातलेली होती. संरक्षण भिbतीचे बांधकाम करण्यासाठी सुमारे आठ फूट खोदाई करून बांधकाम करण्यात आले होते. तसेच आठ फूट खोदाई त्यावर रस्त्यावर सुमारे चार फूट उंचीपर्यंत आतील माती रस्त्यावर टाकलेली होती. सदर संरक्षक भिंतीला लाकडी फळय़ा तसेच फ्लायवूडच्या फळय़ा जोडून त्यामध्ये काँक्रीट घातले होते. सदर काँक्रीटच्या फळय़ा काढण्यासाठी गोपीनाथ रामू राठोड (रा. कोळय़ालताbडा, ता. हुनसगी, जि.- यादगीर- कर्नाटक) व ओमप्रकाश विनायक राठोड (32) (रा. शेवालाल कॉलनी येलगीताडा, तालुका-हुनसगी, जिल्हा-यादगीर, राज्य-कर्नाटक) हे कामगार खाली उतरलेले होते व काम करीत असताना खोदकाम केलेल्या काढण्याची मातीचा ढिगारा अचानक त्यांच्या अंगावर पडून ते मातीखाली गाडले गेले. हि घटना शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली.