भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला पुढे म्हणतात-माझ्या प्राप्तीसाठी तू दूताकरवी आपला गुप्त संदेश पाठविला होतास. परंतु माझ्या येण्याला उशीर होत आहे असे दिसले, तेव्हा तुला हे सर्व जग असार वाटू लागले. त्यावेळी तू आपले शरीर दुसऱया कोणासाठीही योग्य नाही, असे समजून ते सोडण्याचा निश्चय केलास. तुझा हा प्रेमभाव तुझ्या ठिकाणीच राहू दे. आम्ही याची परतफेड करू शकत नाही. फक्त त्याचे कौतुक करतो.
एवं म्हणिजे ऐशिया परी । राया देवकीतनय जो हरि । सुरतक्रीडेच्या अवसरिं । मानवाकारिं रमतसे। स्वरत म्हणिजे आत्मरत । तोही रमेसह ऐसा रमत । नरलोकाची अवगणीभूत । निज आचरित प्रकाशी। षड्गुणैश्वर्यपरिपूर्ण । योगमायाप्रभावेंकरून। अभेदीं भेदांचें रोचन । करी सर्वज्ञ सविलासें । एवं सुरतक्रीडावसरिं। प्रेमसंरंभनर्मोत्तरिं । कृष्ण रुक्मिणी निज मंदिरिं । परस्परें वदलीं जें । तो कृष्णरुक्मिणीप्रेमकलह। सुरतसंरंभकथारोह । कथिल्यावरी कमलानाहो । करी नवलाव तो ऐका। जैसा रुक्मिणीचिये मंदिरिं । परमानंदें क्रीडे हरि। सशतषोडशसहस्रां घरिं । त्याच प्रकारें गृहधर्मीं । शता आगळीं सहस्रें सोळा । आणि या वेगळय़ा अष्ट अबळा। तितुकीं रूपें एकी कमळा । रुक्मिणीदेवी जाणावी । तैसाच तितुक्मया सदनीं पृथक । गृहस्थधर्मीं गृहस्थलोक । वर्तती तैसा यदुनायक। गृहवंतासम वर्ततसे । सर्व लोकांचा गुरु विधाता। त्या विधात्याचाही जो जनिता । तोही नरचर्या अनुसरता। झाला तत्त्वतां कुरुवर्या । इतुकी कथा व्याससुतें । निरूपिली परीक्षितीतें । मुनिचपें सह शौनकातें । सूतपुत्रें निरूपिली ।
महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला म्हणतात – जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण आत्माराम असूनही सामान्य मनुष्यासारखे असे प्रेमालाप करीत रुक्मिणीबरोबर रममाण झाले. जगाला उपदेश करणारे सर्वव्यापक भगवान श्रीकृष्ण याचप्रमाणे अन्य पत्न्यांच्या महामांमध्येसुद्धा गृहस्थाप्रमाणे गृहस्थाश्रमाला उचित अशा धर्माचे आचरण करीत.
श्रीकृष्णाच्या वनिता अबळा । साष्ट सशत सहस्त्रें सोळा । एकैकी दश पुत्रांला । प्रसवत्या झाल्या सर्वही । दश दश पुत्र एकैक कन्या । प्रसवत्या झाल्या सर्वाङ्गना । गुणलावण्यैश्वर्यतुलना । मधुसूदना समसमय । सर्वां सदनीं सम ऐश्वर्य । सर्वां प्रियतम श्रीयदुवर्य। सर्वां कलशीं बिंबे सूर्य । वृष्णधुर्य तत्त्वता पैं । गुणलावण्यसंपदेकरून । पित्याहून सर्व नंदन । ऐश्वर्यप्रतापें अन्यून । समता पूर्ण हे हरीची ।
महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला पुढे सांगतात – श्रीकृष्णांच्या प्रत्येक पत्नीला दहा दहा पुत्र झाले. ते सर्व गुणांच्या बाबतीत वडिलांपेक्षा कमी नव्हते.
पृथक्पृथक् आपुल्या सदनीं । जे ते अच्युतातें देखोनि । बाहीर न वचे कवणे क्षणीं । विसंबूनि आपणया । गृहापासून न वचे दुरी । ऐसें देखोनि नृपकुमारी । मानिती आपुले अभ्यंतरिं । वेधला मम प्रेमें । मजचिवरी हरीची प्रीती । मीचि कृष्णासि आवडती । उपेक्षूनि सर्वही सवती । सदैव वसती मम सदनीं । ऐसें मानिती सर्वही अबळ । नेणती कृष्णाची अतक्मर्य लीळा । जे तो व्यापूनि ब्रह्माण्डगोळा । असे वेगळा उर्वरित ।
ऍड. देवदत्त परुळेकर