ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मान्सूनने यंदा निर्धारित वेळेपेक्षा 12 दिवस आधीच देश व्यापला आहे. भारतीय हवामान खात्याने शुक्रवारी ही माहिती दिली.
साधारणपणे 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो. देशातील शेवटच्या स्थानात असलेल्या पश्चिम राजस्थानमधील श्रीगंगानगरला पोहोचण्यासाठी त्याला 45 दिवस लागतात. सर्वसाधारणपणे 8 जुलैला देश व्यापणाऱ्या मान्सूनने यंदा 12 दिवस आधीच देश व्यापला आहे 2013 मध्ये 16 जूनला मान्सून देशात होता. त्याचवेळी उत्तराखंडमध्ये प्रचंड पूर आला होता. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक रीतान्जया महापात्रा यांनी सांगितले की, 2013 नंतरचा मान्सून या वर्षी देशात इतका वेगवान आहे.