ऑनलाईन टीम / तिरुअनंतपुरम :
नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अपेक्षेप्रमाणे सोमवारी केरळात दाखल झाला.यंदा अंदमानात नियोजित वेळीच मान्सून सक्रिय झाला होता. केरळात 1 जूनपर्यंत तो येईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार मान्सूनचे केरळात आगमन झाले असून, सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
8 जूनच्या आसपास मान्सून कोकणासह महाराष्ट्रात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शेतकरी मान्सूनकडे डोळे लावून बसला आहे. यंदा शतप्रतिशत पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात पावसाकडून मोठया आशा आहेत.
मान्सूनचे आगमन यंदा लांबण्याची शक्यता होती. मात्र, अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून वेळेवर केरळमध्ये दाखल झाला आहे.