वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
गेले दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कंग्राळी बुद्रुक गावच्या पश्चिमेकडून वाहणाऱया मार्कंडेय नदीला दुसऱयांदा पूर आल्यामुण्s नदी काठ परिसरातील शेकडो एकरातील भात पीक पुन्हा पाण्याखाली गेल्यामुण्s पीक कुजून जाण्याच्या निर्माण झाली आहे.
आठवडय़ापूर्वीचे मार्कंडेय नदीला या वर्षातील पहिला पूर आला होता. सध्या दुसऱयांदा पूर आल्याने नदी काठ भात पीक कुजून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. परंतु परत गेले दोन संततधार पावसामुळे नदीला दुसऱयांदा पूर आल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
बांध पुन्हा फुटले
सध्या पडणाऱया संततधार पावसामुळे शिवारातील बांध फुटून शेतवडीत जाणे मुश्कील झाले आहे. भात पिकांवर गाळ पडल्याने भात वर येणे कठीण झाले आहे.