प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यातील 84 शेतकऱयांकडील 1 हजार 668 क्विंटल भात खरेदी करण्यात आले असून जिह्यामध्ये बारदान पुरेशा प्रमाणात असल्याची माहिती प्रभारी जिल्हा पणन अधिकारी प्रभाकर चिले यांनी दिली.
ते म्हणाले की, बारदानाचा पुरेसा साठा मार्केटींग फेडरेशनकडे आह़े भविष्यात तुटवडा भासू नये म्हणून आणखी 3 हजार 700 हजार बारदाने जिह्याला प्राप्त होणार आहेत़ यंदा भाताची खरेदी प्रतिक्विंटल 1 हजार 868 रुपये या दराने होणार आह़े जिल्हय़ात मार्केटींग फेडरेशनच्या 15 केंद्रावर भात खरेदी सुरु असून आतापर्यंत 84 शेतकऱयांकडील भात खरेदी करण्यात आला आह़े