जवळपास 57 शाखांचा राहणार समावेश
गुवाहाटी : आगामी वर्षातील मार्च महिन्यांपर्यंत आसाममध्ये बँक सेवा सुरु करण्यासाठी विविध बँकांच्या जवळपास नवीन 57 बँकांच्या शाखा उघडणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत किशनराव कराड यांनी दिली आहे. कर्जासंबंधी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये मंत्री कराड बोलत होते. सरकार पूर्वोत्तर क्षेत्रासाठी आर्थिक विकासाला तेजी देण्यासाठी विविध उपाययोजना राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसंख्येनुसार शाखा
येणाऱया 31 मार्च 2022 पर्यंत आपल्याकडे वेगवेगळय़ा बँकांच्या जवळपास 57 नवीन शाखा मिळणार आहेत. आसाममधील लोकसंख्येचा विचार करूनच सदरच्या शाखा सुरू करण्याचे स्पष्टीकरण मंत्री कराड यांनी दिले आहे.