तालुक्यातील पाच ठिकाणचा सर्व्हे ; अनेक पशु-पक्षांचे वास्तव्य आढळले
धामापूर तलाव
पोईप तलाव
पेंडूर तलाव
बांदिवडे गडनदी पात्र
डिकवल तळे
मनोज चव्हाण / मालवण:
पाणथळ भूमी संरक्षणाच्या दृष्टीने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हय़ातील 64 पाणथळ भूमीचे सर्वेक्षण करण्यात आले. ‘इस्त्राs’ अहमदाबाद यांनी केलेल्या राष्ट्रीय वेटलँड (पाणथळ भूमी) अटलासनुसार (2010) सिंधुदुर्गात 373 पाणथळ भूमी आहेत. परंतु, 2017 च्या पाणथळ भूमी व्याख्येतील बदलानुसार जिल्हय़ातील 64 जागा या पाणथळ भूमी म्हणून घोषित करण्यासाठी महसूल विभाग आणि जिल्हय़ातील स्वयंसेवी व्यक्तींमार्फत सर्वेक्षणाचे कार्य करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मालवण तालुक्यातील धामापूर तलाव, पोईप तलाव क्षेत्र, पेंडूर तलाव, बांदिवडेतील गडनदीच्या उपनदीचे क्षेत्र आणि डिकवलमधील तळे अशा पाच पाणथळ भूमींचा यात समावेश होता.
मालवण तालुक्यातील बांदिवडे गावालगतच्या प्रदेशातील वाहणारी गड नदीची उपनदी जीचे अक्षांश स्थान 1992 उत्तर व रेखांश स्थान 73, 30, 36 पूर्व असे आहे. या क्षेत्राची निवड पाणथळ भूमी सर्वेक्षणासाठी करण्यात आली आहे. हे क्षेत्र दलदल सदृश असून अनेक प्राणी, पक्ष्यांचे अधिवास असलेले निरीक्षणांती आढळून आले. या पाणथळ भूमीच्या पक्षी निरीक्षणामध्ये ब्लॅक हेडेड इनीस, पम्पेड ग्रीन पिजन, डारटर, ब्राह्मिणी काईट, कारमोरंट इत्यादी अनेक पक्षी आढळले. या पाणथळ भूमीत काही स्थलांतरित पक्षीही निरीक्षणात आढळले. पट्टेरी वाघाप्रमाणेच रेड लिस्टेड पाण मांजरांचे अस्तित्व या भागात आहे. पाणमांजरांची संख्या दिवसागणिक कमी होत असून याच्या संरक्षणासाठी अनेक प्रयत्न देशपातळीवर सुरू आहेत. पाणथळ भूमीच्या जलस्त्राsतामध्ये अनेक माशांच्या प्रजाती असून या भागात पारंपरिक पद्धतीने मत्स्य व्यवसाय केला जातो. ब्ल्यू मॉरमॉन बटरफ्लाय सारख्या प्रजातींचे अस्तित्वही आढळून आले आहे. अनेक वनस्पतींच्या प्रजातींचे अस्तित्व या प्रदेशात आहे. तालुक्यातील धामापूर तलाव, पोईप तलाव, पेंडूर तलाव, बांदिवडे गडनदी पात्र, डिकवल तळे येथेही जैवविविधता आढळून आली आहे.
पाणथळ भूमीचे महत्व मोठे
पर्यावरण सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर असते आणि आपण सदैव त्यावर घाव घालत असतो. पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि संतुलन दृष्टीने पाणथळ भूमी महत्वाची भूमिका बजावतात. अनेक पक्षी प्राणी यांचे हे अधिवास घरकुल आहे हे आपण विसरूनच गेलो आहोत. पर्जन्य संपन्न सिंधुदुर्ग जिल्हा जलटंचाईच्या विळख्यात आहे. अनेक गावांमधून पाणीटंचाईचा स्वर ऐकायला मिळतो. या समस्येवर एक दुर्लक्षित उपाय म्हणजे पाणथळ भूमी. या जलसमृद्ध भूमी पाणी अडवून ठेवतात. या पाणथळ भूमीमुळे मोठय़ा प्रमाणात भू-जल पातळीत वाढ होते. पूरजन्य परिस्थितीमुळे याच पाणथळ भूमी अतिरिक्त पाणी आपल्यात सामावून घेतात व पूरप्रभाव कमी करतात. अशा अनेकप्रकारे या भूमी महत्वाच्या आहेत. या क्षेत्रांचे संवर्धन संरक्षण केले, तर नक्कीच पक्षांची, प्राण्यांची संख्या वाढेल. दुर्मिळ, दुर्लभ वनस्पती संरक्षित राहतील. पक्षी निरीक्षक, पर्यावरण अभ्यासक, पर्यटक या क्षेत्रात आकर्षिले जातील. इको-टुरिझम संकल्पना सत्यात उतरेल. जैवविविधतेचे जतन होईल इत्यादी उद्देश पाणथळ संवर्धन उपक्रमामागील आहेत, असे या क्षेत्रात काम करणाऱया तज्ञांनी स्पष्ट केले.