प्रतिनिधी/ फोंडा
पार-उसगांव येथे मालवाहू ट्रकने दुचाकीला ठोकरल्याने दुचाकीचालकांचा मृत्यू झाला. संदेश सुभाष गावडे (21, पारोडा, देऊळवाडा-पाळी) असे त्याचे नाव आहे. सदर अपघात काल शनिवारी सायं. 5 वा. सुमारास घडला.
प्राप्त माहितीनुसार संदेश हा आपली दुचाकी जीए 04 के 7921 प्लेझरने खांडेपार येथील एटीएमकडे जात होता. पार उसगांव येथील शितल बार जवळ पोचले असता फोंडय़ाहून उसगांवमार्गे जात असलेला मालवाहू ट्रक केए 22 1223 ओव्हरटेक करण्याच्या नादात असताना दुचाकीला ठोकरल्याने हा अपघात घडला. अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला. दुचाकीचालक रस्त्यावरून बाहेर फेकला गेला. अत्यवस्थ अवस्थेत संदेश याला पिळय़े धारबांदोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठविण्यात आला असून याप्रकरणी उपनिरीक्षक विभीनव शिरोडकर अधिक तपास करीत आहे.
आईचा आधार गेला..
मयत संदेश गावडे हा आपल्या आईचा एकुलता असून त्याचे पितृछत्रही यापुर्वी हरपलेले आहे. त्यामुळे आईचा आधारच गेला आहे. नुकताच बारावीपर्यंत शिक्षणानंतर आयटीआय प्रशिक्षण घेऊन बेतोडो येथील क्रॉम्टन ग्रिव्हस या कंपनीत तो दीड वर्षापासून कामाला लागला होता. अत्यंत मनमिळावू म्हणून तो मित्रामध्ये परिचित होता. हलाखीच्या परिस्थितीतून आपल्या आईला आत्ताच आधार देत असताना प्रुर काळाने त्याच्यावर झडप घातली. देऊळवाडा पाळी येथे शोककळा पसरली आहे.
पोलिसांचा निष्काळजीपणा, जमाव संतत्प
अपघातात कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकांला अटक करण्याचे सोडून वाहनासह जाण्याची मोकळीक दिल्याचे ग्रामस्थांची तक्रार आहे. जमावाने याप्रकरणी हस्तक्षेप केल्यानंतर अपघातात कारणीभूत ठरलेल्या वाहन घेऊन जाण्यापासून अडविण्यात आले. त्यामुळे पोलिसांचाही दुटप्पीपणा या अपघातास्थळी दिसून आला. पंचनामाचे सोपस्कर योग्यरित्या पुर्ण न केल्याचा संशय संतत्प जमावाने व्यक्त केला आहे. याप्रकरणी निष्ळकाळजीपणे वाहन हाकणाऱया चालकांला अटक करावी तसेच गरीब कुटूंबियाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.