पुणे / प्रतिनिधी :
आजही प्रत्येक घरात एक दिवाणखाना असतो आणि तिथे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून टी. व्ही. बघतात. त्यामुळे टी. व्ही. वरील सर्व मालिका कुटुंबाला डोळय़ासमोर ठेवून घरातील लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व बघू शकतील, अशा पद्धतीने बनणे आवश्यक आहे. अगदी गुन्हेविषयक, रहस्य कथांवर आधारित मालिकाही अशाच पद्धतीने लिहायला हव्यात. त्यादृष्टीने लेखक, दिग्दर्शकांनी विचार करणे व काळानुसार बदलण्यास तयार असायला पाहिजे, असे मत प्रसिद्ध मालिका सीआयडीचे दिग्दर्शक बी. पी. सिंग यांनी व्यक्त केले.
‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आयोजित पत्रकार परिषदेत सिंग बोलत होते. या वेळी सीआयडी मालिकेतील अभिनेत शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव, दयानंद शेट्टी व ‘पुणे फिल्म फाउंडेशन’चे अध्यक्ष व ‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल यावेळी उपस्थित होते.