वार्ताहर / म्हासुर्ली
राधानगरी, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यातून वाहणाऱ्या धामणी नदीवरील सर्व माती बंधाऱ्या मधील पाणी संपल्याने लहान मोठ्या डोहातील मासेमारी करण्यासाठी खवयांची गर्दी वाढ चालली आहे. तसेच कोरोनामुळे दीड – दोन महिन्यापासून शहरांतून गावात दाखल झालेले चाकरमानी लोक सुट्टीबरोबरच मासेमारीचा ही आनंद लुट असल्याचे चित्र आहे.
धामणीखोरा प्रामुख्याने डोंगराळ असून नैसर्गिक साधनसंपत्तीने समृध्द आहे. मात्र या भागासाठी वरदान ठरणारा धामणी मध्यम प्रकल्प रखडल्याने शेती व्यवसायाचा पाण्याअभावी विकास करण्यास अडचणी येत आहेत. परिणामी येथील शेतकरी त्यातूनही मार्ग काढत नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यात नैसर्गिक पणे वाहणाऱ्या धामणी नदीतील पाणी मातींच्या बंधाऱ्यात अडवून पाणीसाठाकरतात. व सदर साठवलेल्या पाण्याच्या आधारे उन्हाळ्यातील उर्वरीत महिन्यात पर्यत शेततातील पिके जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात. मात्र अशा मातीच्या बंधाऱ्यांमधील पाणी एप्रिल महिन्यात पूर्णतः संपण्यास सुरुवात होते. तर मे महिन्यात कडक उन्हाळ्यात येथील पिके पाण्याअभावी वाळत जातात. परंतु या वर्षी बंधारे लवकर घालण्यात आल्याने व गेल्या महिन्याभरात धामणी खोऱ्यात वळीव पावसाने पण हजेरी लावल्याने थोडे फार पिकांना जीवदान मिळाले असून धरणातील पाणी साठा शिल्लक राहिला होता.
परंतु गेल्या आठ-दहा दिवसापासून शेतकऱ्यांनी नदीवरील विद्युत पंपाव्दारे शेतीस पाणी देण्यास सुरुवात केल्याने माती बंधाऱ्यामधील पाणी झपाट्याने संपत चालले आहे. त्यामुळे मासेमारी करणाऱ्यांचे पाय उपसुक नदी किनारी वळले असून भल्या पहाटेपासूनच ते उशीरा संध्याकाळपर्यत मासेमारी करण्यासाठी खवय्यांची गर्दी नदी पात्रात दिसत असल्याचे चित्र आहे. मासेमारी करण्यासाठी लहान मुलांच्या पासून वृद्धांच्या पर्यत मोठी जाळी, लहान पागरी घेऊन लवाजमा पाण्यात उतरत असून तहान भूक हारवून काही तास जोमाने मासेमारी करत आहेत. त्यामुळे माणसांनी नदी किनारा फुलून जात आहे. तसेच सध्या कोरोना व्हायरसमुळे लॉक डाऊन जाहिर झाल्यामुळे अनेक चाकरमानी शहरे सोडून आपला गाव बरा म्हणत गेल्या दीड – दोन महिन्यांपासून गावकडेच येऊन राहिले आहे. मात्र सध्या असे चाकरमानी सुद्धा पूर्वीच्या आठवणी जागृत करत मासे मासे करण्यासाठी नदीच्या पाण्यात सूर मारताना दिसत असून लॉकडाऊन सुट्टीबरोबर मासे पकडण्याचा अस्वाद घेत आहे.