ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले की, आमचे राज्य हे पहिले राज्य आहे, ज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात मास्क लावणे बंधनकारक करण्यासाठी कायदा करीत आहे. गेहलोत यांनी याबाबत सोमवारी ट्विट करीत ही माहिती दिली.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, राजस्थान देशातील पहिले असे राज्य आहे की, आमच्या राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क लावणे बंधनकारक करण्यासाठी कायदा बनवला जात आहे. जो पर्यंत लस येत नाही तोपर्यंत मास्क लावणे हीच मोठी लस आहे आणि हा मास्कच आपल्याला कोरोना पासून वाचवेल.
पुढे ते म्हणाले, राज्यात 2 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आलेल्या ‘नो मास्क नो एंट्री- कोरोना विरोधात जन आंदोलन’ अभियाना सोबतच सरकार आज कायदा करत मास्क लावणे देखील बंधनकारक करीत आहे. यासंबंधी एक संशोधक विधेयक शनिवारी विधानसभेत सादर केले होते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.