प्रतिनिधी / सातारा :
कोरोना कमी झाला असेलही; पण तो संपलेला नाही. याची तमा न बाळगता वाढत्या गर्दीतही नागरिक बेजबाबदारपणे वागू लागले आहेत. परिस्थिती फारशी बदललेली नाही, तरीही नाकावरचा मास्क हळहळू जागा बदलू लागला आहे. काहीजण मास्क लावतच नाहीत, काही जण फक्त तोंडावर ओढतात, तर काही नागरिक मास्क हनुवटीवर घेऊन बिनधास्त वावरत असून, सामाजिक स्वास्थ्याची तमा न बाळगता रस्त्यावर पिचकाऱ्या मारणारेही खूप आहेत.
बाजारपेठ, बस स्थानक, बॅंकेत, शासकीय- खाजगी कार्यालय, एसटीत अगदी गर्दीतही नागरिक नाका तोंडावर लावायचा मास्क हनुवटीवर आणतआहेत. तसेच रस्त्यावर पिचकाऱ्या मारणेहीसुरूच आहे. यातून कोरोना विषाणूचाप्रसार होतो, बाधा होऊ शकते हे सारेअनेक नागरिक विसरून गेल्याचे जाणवतआहे. आता तर दिवाळीसारखा मोठासण आहे. बाजारपेठेत गर्दी ही वाढणारचआहे. मास्क न लावल्यास 500 रुपये दंडआहे, तर रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणीधुंकणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाईची मागणी होत आहे.
दिवाळीच्या गर्दीच्या काळात तरीनागरिकांनी कायद्याच्या धाकाने नव्हे तरमनाने व सर्वांच्या हितासाठी कोरोना प्रसारहोऊ नये यासाठीच्या शासन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.