वाढत्या रूग्णसंख्येमुळे केंद्राचे नागरिकांना आवाहन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढ आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी घरातून बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन शनिवारी केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आले. हा मास्क समुहाला कोरोनाची बाधा होण्यापासून बचाव करेल, असा विश्वासही सरकारने व्यक्त केला आहे.
देशात शनिवारी कोरोनाग्रस्तांची संख्या 2902 झाली आहे. आतापर्यंत 68 मृत्युमुखी पडले आहेत. शनिवारी केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, नागरिकांनी आपल्यासह समुदहाचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरातून बाहेर पडताना घरगुती मास्कचा वापर करण्याची गरज आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. वैद्यकीय सुविधा देताना वारण्यात येणारे मास्क डॉक्टर व वैद्यकीय सेवा देणाऱयांसाठी ठेवण्यात यावेत, तर सर्वसामान्य नागरिकांनी घरात तयार केलेले मास्क वापरावेत, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अमेरिकेत आतापर्यत सात हजार नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. तर दोन लाख 70 हजार नागरिक बाधित झाले आहेत.