साहित्य : अर्धी वाटी रवा, पाव वाटी बारीक चिरलेला कांदा, पाव वाटी मटार, पाव वाटी बीन्स छोटे तुकडे करून, पाव वाटी गाजर तुकडे, पाव वाटी मशरूम तुकडे, 3 चमचे तेल अथवा तूप, 3 वाटी पाणी, चवीपुरते मीठ, 2 चमचे कोथिंबीर, 2 चमचे पुदिना पाने, 1 चमचा कसूरीमेथी, 1 वाटी बटाटा वाफवून मॅश करून, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, 2 चमचे चीज खिसून
कृती : गरम तेलात कांदा आणि सर्व भाजा परतवून घ्याव्यात. तीन ते चार मिनिटांनंतर त्यात रवा आणि पाणी मिक्स करून मंद आचेवरच चांगला परतवून घ्यावा. नंतर त्यात मीठ टाकून मिश्रण आणखी पाच मिनिटे परतवावे. आता आच बंद करून त्यात मॅश केलेले बटाटे, हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर आणि कसूरीमेथी घालून मिश्रण मिक्स करावे. वरून खिसलेले चीज घालावे. मिश्रण थोडे गार झाले की त्याचे चौकोनी कटलेट बनवून अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवावेत. नंतर तव्यावर तेल पसरवून कटलेट शालोफ्राय करावेत. आता तयार मिक्स व्हेजी ग्रीन चटणी अथवा सॉससोबत खाण्यास द्या.