ऑनलाईन/टीम
आसाम आणि मिझोराम या दोन राज्यात सीमावादावरुन सध्या वाद सुरु आहे. दरम्यान, मिझोराम पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आसामच्या ६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर आसाममध्ये कार्यरत असलेले मराठमोळे IPS वैभव निंबाळकर यांच्या पायाला गोळीलागल्याने ते जखमी झाले आहेत. या सर्व हिंसाचारानंतर आता मिझोरामने थेट आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री हिंमत सरमा यांच्यावर हत्येचा प्रयत्न, कट रचल्याचा आरोप असे अनेक गंभीर गुन्हे लावण्यात आले आहेत. इतंकच नाही तर त्यांना उद्या पोलीस स्टेशनला हजर राहण्यास सांगितलं आहे.
मिझोराम पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्र्यांसह सहा वरिष्ठ अधिकारी आणि २०० पोलिसांवर गुन्हे दाखल केले आहेत. मिझोराम पोलीस महासंचालक जॉन एन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्वांविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि अन्य गुन्हेगारी कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहेत. सीमांत नगरजवळ मिझोराम आणि आसाम पोलिसांमध्ये हिंसक झटापट झाली होती. त्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.