प्रतिनिधी/मिरज
पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात प्रसिद्ध असलेला आणि दर बुधवारी भरणारा मिरजेचा जनावरे बाजार तब्बल सात महिन्यांच्या प्रदीर्घ खंडानंतर उद्या बुधवार 21ऑक्टोंबरपासून पुन्हा सुरू होत आहे. मिरज दुय्यम बाजार आवार समिती प्रशासनाने बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगली सोय होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मिरजेच्या या बाजारात सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बेळगाव आणि विजापूर या जिल्ह्यातील लहान-मोठ्या जनावरांच्या खरेदीसाठी येतात. लाखो रुपयांची उलाढाल या बाजारात होत असते. आज सदर बाजार सुरू होत असल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.