कपिलेश्वर तलावात 110 सार्वजनिक श्रीमूर्तींचे विसर्जन
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा श्री विसर्जन मिरवणूक झाली नसली तरी विसर्जनाची प्रक्रिया तब्बल 12 तास चालली. कपिलेश्वर परिसरातील दोन्ही तलावांमध्ये 110 सार्वजनिक श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मिरवणूक नसली तरी गणेशभक्तांचा उत्साह मात्र काही कमी नव्हता.
उपलब्ध माहितीनुसार नव्या तलावात 77 व जुन्या तलावात 33 असे एकूण 110 सार्वजनिक श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पहिल्या व रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास शेवटच्या श्रीमूर्तीचे विसर्जन झाले. शेवटी महानगरपालिकेच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
महानगरपालिकेचे आयुक्त के. एच. जगदीश, मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, गुन्हे तपास विभागाचे एसीपी महांतेश्वर जिद्दी, मनपा अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे आदी अधिकाऱयांच्या उपस्थितीत रात्री महानगरपालिकेच्या श्रीमूर्तीचे विसर्जन झाले. पोलीस व महापालिकेच्या अधिकाऱयांनी सहकार्याबद्दल गणेशभक्तांचे आभार मानले. यावेळी तिन्ही महामंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दुपारी 4 पर्यंत कमी प्रमाणात विसर्जन झाले. या वेळेत नव्या तलावात केवळ 15 सार्वजनिक श्रीमूर्तींचे विसर्जन झाले होते. 4 नंतर रात्री 10.30 पर्यंत या प्रक्रियेला वेग आला. सरकारी नियम पाळत सार्वजनिक श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीला फाटा दिला गेला असला तरी भक्तीमय वातावरणात गणरायांना निरोप देण्यात आला.
‘पुढच्या वषी लवकर या’च्या जयघोषात अनेक मंडळांनी गुलाल उधळत आतषबाजीही केली. आपल्या लाडक्मया बाप्पाला निरोप देताना कोरोनाचे संकट दूर कर, असे साकडे घालून जड अंतःकरणाने गणरायांना निरोप देण्यात आला. पुणे-मुंबईनंतर बेळगावच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. कोरोना महामारीमुळे यंदा मिरवणूक झाली नाही तरीही गणेशभक्तांचा उत्साह कायम होता.