पश्चिम बंगालमधील निवडणुकीवर नजर : ममतांच्या अस्मितावादी राजकारणाला प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीला अद्याप वर्षभराचा कालावधी असला तरीही भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. ‘मिशन 250’ अंतर्गत पश्चिम बंगालमध्ये भाजप प्रचार करणार आहे. निवडणूक व्यूहनीतीत कुठलीच त्रुटी राहू नये आणि याप्रकरणी भाषा अडसर ठरू नये याकरता भाजप अध्यक्षा बंगाली भाषा शिकत आहेत. बांग्ला भाषेचे धडे देणारा एक शिक्षकही त्यांनी नियुक्त केला आहे.
बंगाली भाषा समजावी आणि पश्चिम बंगालमधील सभांमध्ये स्वतःच्या भाषणांचा प्रारंभ बंगालीतून करता यावा, असा शाह यांचा प्रयत्न आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ‘मां, माटी और मानुष’ असा नारा देतात आणि अलिकडच्या काळात त्यांनी बंगाली अस्मितेला फुंकर घालण्याचा प्रयत्न चालविला आहे. ममता बॅनर्जी यांनी अमित शाह यांना नेहमीच ‘बाहेरचा’ असे संबोधिले आहे.
व्यूहनीतीकार
निवडणूक व्यूहनीतीत अमित शाह यांना प्रावीण्य प्राप्त असल्याचे मानले जाते आणि प्रत्येक निवडणुकीसाठी शाह हे वेगळय़ा प्रकारची व्यूहनीती आखत असतात. पण महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत झालेली चूक तसेच झारखंडमध्ये पक्षाच्या पराभवानंतर शाह यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीची जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे. तेथील यशाकरता कार्यकर्त्यांशी संवाद आणि समन्वय आवश्यक आहे. याच कारणामुळे भाषेचा अडसर होऊ नये म्हणून शाह बंगालीचे धडे गिरवत आहेत.
गुजरातप्रवेशावर बंदी….
भाजप अध्यक्ष अमित शाह बांग्ला तसेच तमिळ समवेत विविध राज्यांमध्ये बोलल्या जाणाऱया 4 भाषा शिकत आहेत. अनेक वर्षे गुजरातमध्ये राहूनही अमित शाह अत्यंत चांगल्याप्रकारे हिंदी कशी बोलू शकतात असा प्रश्न अनेक जण उपस्थित करतात. न्यायालयाकडून गुजरातमधील प्रवेशावर दोन वर्षांची बंदी घातल्यावर शाह यांनी उत्तर भारताचे दौरे करून हिंदी भाषेवर प्रभुत्व प्राप्त केले होते.
शास्त्राrय संगीताचे शिक्षण
भाजप अध्यक्ष होण्यापूर्वी शाह यांनी देशभराचा दौरा करून प्रमुख तीर्थस्थळांना भेटी दिल्या आहेत. या दौऱयांमुळे देशाच्या सर्व भागातील राजकीय, सामाजिक आणि धार्मिक पैलू समजून घेण्यास त्यांना मदत झाली. शाह यांच्या या अभ्यासामुळे उत्तरप्रदेश आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये निवडणूक मोहिमेला यश मिळविता आल्याचे सांगण्यात येते. बहुभाषिक असण्यासह शाह यांनी शास्त्राrय संगीताचेही शिक्षण घेतले आहे.
भाजपचे लक्ष्य
294 सदस्यीय विधानसभा असणाऱया पश्चिम बंगालमध्ये भाजपने ‘मिशन 250’चे लक्ष्य निर्धारित केले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 42 पैकी 18 जागांवर विजय मिळविला होता. तर तृणमूल काँग्रेसला 22 जागांवर यश मिळाले होते. तृणमूलने भाजपहून अधिक जागा जिंकल्या असल्या तरीही भाजपने पश्चिम बंगालमध्ये मिळविलेले हे यश अत्यंत लक्षवेधी ठरले आहे.