आज वाचकांनी स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो म्हणजे ‘मी कोण आहे?’ प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असणार आहे. कोण म्हणेल मी सागर आहे, कोण म्हणेल मी विजया आहे, कोण म्हणेल मी माझ्या आईचे बाळ आहे तर कोण म्हणेल मी शिक्षक आहे. वरील सर्व वाक्मयांमध्ये तुम्ही कोण आहात हे कुणीच सांगितलेले नाही. कुणी आपले नाव सांगितले, कुणी नाते तर कुणी व्यवसाय. खरच एवढीच ओळख आहे का आपली? आपल्या आई वडिलांनी जे नाव दिले आहे ते म्हणजेच आपण आहोत का? तर त्याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. मग आपण नेमके कोण आहोत, आपण का आलो आहोत या पृथ्वीवर असे प्रश्न कधी पडतात का तुम्हाला? पडत असतील तर त्या सगळय़ाच प्रश्नांची उत्तर तुम्हाला Pranic Healing Achieving Oneness With Higher Soul या वर्गात मिळतील. आता आपण वळूया आपल्या आजच्या प्रश्नाकडे, ‘मी कोण आहे?’. आपण छोटे प्रयोग करूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
प्रयोग 1. तुम्ही तुमचे हात हलवा. त्यानंतर पाय हलवा.
आता मला सांगा तुम्ही काय करता आहात? ‘मी’ हात हलवत आहे. काय हलविले जात आहे? हात हलविले जात आहेत. तुम्ही म्हणजेच तुमचे हात आहात का? नाही, हात माझा अवयव आहे. मग हात कोण हलवत आहे? ‘मी’ हलविणारा आहे व हात म्हणजे हलवली जाणारी वस्तू आहे. अशाचप्रकारे पाय म्हणजे तुम्ही आहात का? तुमचे बाकीचे अवयव म्हणजे तुम्ही आहात का? तर नाही. तुमचे अवयव म्हणजे तुम्ही नाही.
प्रयोग 2. विचार करा की तुम्ही एका समुद्रात बसलेले आहात. तुमच्या चारही बाजूला पाणी आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी तुमच्या मानेपर्यंत आहे. आता हळूहळू तुमचे पाय वाहून चालले आहेत. शांतपणे विचार करा. एक पाय वाहून गेला त्यामागोमाग दुसरा पाय वाहून गेला. मला सांगा तुम्ही आहात का? उत्तर आहे ‘हो’. आता तुमचे दोन्ही हात वाहून चालले आहेत. आता तुम्ही आहात का? उत्तर आहे ‘हो’. आता तुमचे धड वाहून गेले आहे. चेहरा वाहून गेला आहे. पूर्ण शरीर समुद्राच्या पाण्यात वाहून गेले आहे. आता सांगा तुम्ही आहात का? उत्तर आहे ‘हो’ तुम्ही आहात. हे उदाहरण देण्यामागचे मर्म लक्षात आले असेल. तुम्ही म्हणजे तुमचे शरीर नाही. तुम्ही म्हणजे ‘आत्मा’ आहात. तुम्ही अमर आहात. आता एका फळाचा विचार करा, कोणत्याही फळाचा. तुम्ही काय करता आहात? तुम्ही फळाचा विचार करता आहात. फळ म्हणजे तुम्ही आहात का? तर नाही. तुम्ही फळाच्या विचाराची निर्मिती केली. तुम्ही म्हणजे फळ नाही. अशा रीतीने आयुष्यात येणारा प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, वेदना ही आपण तयार करतो ती भावना, ती वेदना, तो विचार म्हणजे आपण नाही.
तुम्ही मन आहात का? नाही. मन हे फक्त एक ‘मी आहे’चे किंवा आत्म्याचे सूक्ष्म साधन आहे. आत्मा विचार व भावनांची निर्मिती करण्यासाठी मनाचा वापर करतो. म्हणून विचार व भावना ही फक्त निर्मिती आहेत. मन संगणकाप्रमाणे आहे, जे दिलेल्या माहितीवर प्रक्रिया करते. ‘मी आहे’ किंवा आत्मा म्हणजेच व्यक्ती जी संगणक चालवते. ज्याप्रमाणे तुम्ही जे संगणक चालवता ते स्वतः संगणक नसतात त्याप्रमाणेच मन म्हणजे तुम्ही नव्हे.
रोजच्या जीवनात आपण अनेक गोष्टी ठरवतो पण दिवस संपताना आपल्या लक्षात येईल की त्यातल्या सगळय़ाच गोष्टी आपल्याकडून झालेल्या नाहीत, असे का होते? किंवा सकाळी आपल्याला लवकर उठून कामावर जायचे आहे हे माहीत आहे तरीही अलार्म वाजून गेल्यावरसुद्धा आणखी काही वेळ आपण का झोपतो? एखादी वाईट घटना घडून बराच काळ लोटला असला तरी आजच्या तारखेला आपल्याला त्या घटनेचे तितकेच दुःख का वाटते? याचे उत्तर आहे तुमच्या भावना तुमच्यावर काबू करतात. जेव्हा तुम्ही स्वतःला सांगाल, की मी म्हणजे माझ्या भावना नव्हे, मी म्हणजे माझे विचार नव्हे, मी म्हणजे माझे शरीर नव्हे, मी ‘मी’ आहे. कुठल्याही कामात आळस, अडचण आल्यास या चार ओळी म्हणा आणि बघा काय बदल होतो ते. मास्टर चोआ सांगतात, ‘जेव्हा आपण ही वाक्मये बोलतो तेव्हा आपल्या शरीराचे नियंत्रण आपोआप आपल्या आत्म्याकडे जाते. आपले शरीर हे फक्त वाहन आहे ड्रायव्हर आपला आत्मा आहे. गाडीचा कंट्रोल ड्रायव्हरकडे असणे केव्हाही उत्तमच. ज्या दिवशी तुमचा आत्मा तुमच्या शरीरावर नियंत्रण ठेवेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की समोर येणाऱया संकटांचा, अडचणींचा किंवा अगदी आनंदाच्या क्षणाचाही तुम्हाला तितका फरक पडत नाही. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही शांत राहता’.
तुमच्या आजूबाजूला तुम्ही दररोज बरीच माणसे बघता, अनुभवता. तुम्हाला कधी असे वाटते का की, हा किती मोठा माणूस आहे तरीही निर्णय घेताना आपण वेंधळेपणा करतो किंवा किती लहान मूल आहे पण मोठय़ा माणसाला लाजवेल एवढे समंजस वागते. असे यासाठी होते कारण एखादा आत्मा पृथ्वीवर वारंवार जन्म घेतो त्याउलट दुसरा आत्मा घेत नाही. मनुष्यजन्मात आल्यावर तुम्ही काय शिकता यावर तुमचा आत्मा पुन्हा जन्म घेईल की नाही हे ठरते. त्यामुळे लहान वयातील मुले जेव्हा त्यांच्या वयापेक्षा जास्त समंजस वागतात तेव्हा त्यांच्या आत्म्याने बऱयाचवेळा जन्म घेतला आहे असे समजायचे. याउलट वय जास्त असूनही ज्यांचा वेंधळेपणा गेलेला नाही ज्यांना कशाचेच गांभीर्य नाही, ते या जगात नवीन आहेत असे म्हणायचे. प्राणिक हीलिंगच्या वर्गात आम्हाला सांगितले गेले की आजपासून जेव्हा तुम्हाला कोणी भांडताना दिसेल किंवा तुम्हाला वाईट वाटेल अशा गोष्टी तुमच्या आजूबाजूची माणसे करतील तेव्हा थंड डोक्मयाने म्हणा, ‘ते या पृथ्वीवर नवीन आहेत. मी फार जुना आहे. या गोष्टींचा माझ्यावर काहीही परिणाम मी होऊ देणार नाही.’ आजपासून तुम्हीसुद्धा हे करून बघा आणि आयुष्यात कशी गंमत येते ते अनुभवा.
-आज्ञा अभिषेक कोयंडे