ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्याच पार्टीतील एका नेत्यावर आक्रमक झालेले दिसले. त्या नेत्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट टीका न करता पक्षाच्या धोरणावर टीका केली पाहिजे असे मत नोंदवले होते. हे मत राहुल गांधी यांना न पटल्याने ते आक्रमक झाले आपण थेट टीका का करतो हे देखील स्पष्ट केले.
राहुल गांधी म्हणाले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरत नाही आणि यापुढे ही मी अशीच टीका करत राहीन पण पक्षातील काही नेते त्यांच्यावर टीका करण्यापासून दूर राहतात, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आणीबाणीच्या बहाण्याने गांधी कुटुंबियांवर निशाणा साधत म्हटले की, काँग्रेसमधील नेते पक्षात घुसमटून जातात.
राहुल गांधींवर निशाणा साधताना ट्विट करत अमित शहा म्हणाले की, सीडब्ल्यूसीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये वरिष्ठ आणि युवा सदस्यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते. पण त्यांना गप्प बसवण्यात आले. पार्टीच्या एका प्रवक्त्याला काही विचार न करता काढून टाकण्यात आले. पण दुःखद सत्य हे आहे की, काँगेस पक्षात नेत्यांचा दम घुसमटतआहे.
पुढे ते म्हणाले, भारतातील विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला स्वतःला प्रश्न विचारण्याची गरज आहे. आणीबाणीची मानसिकता आत्तापर्यंत का राहिली आहे? एकाच घराण्यातील लोक वगळता अन्य लोकांना बोलण्याची परवानगी का नाही? काँग्रेसमधील नेते निराश का आहेत? नाही तर इतर लोकांबरोबर असलेले त्यांचे संबंध कमी अधिक होतील असे त्यांनी यावेळी सांगितले.