नदी झाडेझुडपे केरकचऱयांच्या विळख्यात : पश्चिम भागातील शेतकऱयांसाठी जीवनदायी ठरणारी नदीः प्रशासनाचे दुर्लक्ष
आण्णाप्पा पाटील / बहाद्दरवाडी
‘पाणी आडवा पाणी जिरवा’ यो योजनेंतर्गत प्रशासनामार्फत लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. ग्रामीण भागातील काही नदी नाल्यांवर पूल बांधण्यासाठी सरकारमार्फत योजना राबविली जाते. पण या नदी व नाल्यांच्या नियोजनाकडे प्रशासन लक्ष देते का? असा सवाल पश्चिम भागातील मुंगेत्री नदीची सध्याची परिस्थिती पाहिल्यास उपस्थित होत आहे? मुंगेत्री नदी झाडे-झुडपे, केरकचरा व अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. या नदीच्या अस्तित्वासाठी नियोजनाची गरज निर्माण झाली आहे.
पश्चिम भागातील शेतकऱयांसाठी मुंगेत्री नदी जीवनदायी ठरणारी आहे. एकेकाळी या नदीच्या पाण्यावर आजूबाजूचे शेतकरी विविध प्रकारची पिके घेत होते. मात्र गेल्या दहा-बारा वर्षांपासून नदीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. ही नदी पूर्णपणे झाडा-झुडपांनी व्यापली आहे. नदीच्या काठावर व नदीत काहीजण केरकचरा आणून टाकत आहेत. तर नदीच्या बऱयाच ठिकाणी अतिक्रमणही झाले आहे. यामुळे मुंगेत्री नदीचे अस्तित्व धोक्मयात आले आहे.
किणये डोंगरावरून या नदीचा उगम झाला आहे. किणये शिवारातून ही नदी वाघवडे शिवारात गेली असून पुढे ही नदी खानापूरच्या मलप्रभा नदीला जाऊन मिळाली आहे. किणये, बहाद्दरवाडी, शिवनगर, रणकुंडये, संतिबस्तवाड, वाघवडे या भागातील शेतकऱयांसाठी ही नदी अत्यंत महत्त्वाची आहे. नदीच्या काही ठिकाणी पूल बांधण्यात आलेले आहे. मात्र या पुलांच्याठिकाणी पाणी अडविण्याची प्रक्रिया व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी शेतकरी वर्गातून होत आहे.
पुलाचे कामही अर्धवट
संतिबस्तवाड गावाजवळील जुन्या पुलावर दरवषी पावसात पाणी येते. जुना पूल पूर्णपणे खचला असल्याने त्याच्या बाजूलाच नवीन पूल बांधण्यात येत आहे. मात्र या पुलाचे कामकाजही अर्धवटस्थितीत असल्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी आलेल्या महापुरामुळे जुना पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. या ठिकाणाहून येणारी एक कार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. त्यात त्या गाडी चालकाचा मृत्यूही झाला
होता.
नियोजनाअभावी नवीन पुलावरही पाणी
संतिबस्तवाड गावातील नागरिकांनी जुना पूल नव्याने बांधण्यात यावा, अशी मागणी केली होती. यामुळेच जुन्या पुलाच्या बाजूलाच नवीन पूल बांधण्याचे कामकाज हाती घेण्यात आले, पण या नवीन पुलाची उंची वाढविण्याची गरज होती. मात्र संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी योग्यती पाहणी न करता घाईगडबडीने पुलाचे बांधकाम केले. या नवीन पुलावरही गेल्यावषी पाणी आले होते. त्यामुळे मोठा पाऊस आल्यास या पुलावरही पाणी येणार असल्यामुळे पुलाचा म्हणावा तसा उपयोग होणार नाही, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.
सुगी हंगाम झाल्यानंतर नदीच्या आजूबाजूला असणाऱया शेत शिवारामध्ये शेतकरी विविध प्रकारचा भाजीपाला घेत होते.
पूर्वी संक्रांतीपर्यंत या नदीत पाण्याचा साठा राहत होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून डिसेंबर महिन्यातच नदी कोरडी पडू लागली आहे. किणयेपासून वाघवडेपर्यंत ठिकठिकाणी नदीवर पूल बांधण्यात आले आहेत. नदीचे पाणी कमी होत असतानाच त्या पुलाच्या ठिकाणी फळय़ा घालून पाणी अडविण्याची गरज असते. मात्र याकडे दुर्लक्ष झाले असून, ग्राम पंचायतही यावर विचार करत नाही. अशी माहिती शेतकऱयांनी दिली
आहे.
नदीत पाणीसाठा टिकून राहण्यासाठी प्रयत्नांची गरज
या परिसरातील शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणून दूध व्यवसाय करतात. बऱयाच जणांच्या घरात दोन ते चार जनावरे ठरलेलीच असतात. गाई, म्हशींचे पालन करून रोज दूध विक्री करून अनेक जण आपल्या संसाराचा गाढा चालविताना दिसतात. या दुभत्या जनावरांसाठी शेतकरी त्यांना दिवसभर चरण्यासाठी सोडतात. व सायंकाळी येताना त्यांना पाण्याची गरज असते. नदीत पाणी असते त्यावेळी जनावरांना त्याचा उपयोग होतो. मात्र उन्हाळय़ात नदी कोरडी पडली की, जनावरांचे पाण्याविना हाल होतात, त्यामुळे नदीत पाणीसाठा टिकून राहण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी शेतकऱयांचीं मागणी आहे.
पहिल्यांदाच वळीवामुळे नदीला पाणी
गेल्या आठ दिवसापूर्वी झालेल्या वळीव पावसामुळे मुंगेत्री नदीला पाणी आले होते. पहिल्यांदाच वळिवाच्या पावसात नदीला पाणी आले. यावरून ही नदी किती महत्त्वाची आहे याची जाणीव पुन्हा एकदा परिसरातील शेतकऱयांना झाली आहे. किणये धरणात बऱयापैकी पाणीसाठा झाल्यास या नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार
आहे.
पुलाचे कामकाज पूर्ण करावे
परिसरातील शेतकऱयांसाठी ही नदी जीवनदायी ठरू शकते, मात्र नदीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. पूल बांधताना त्याची उंची वाढविण्याची गरज होती. या नवीन पुलावरही पाणी येत असल्यामुळे सरकारचा निधी वाया गेला आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी या ठिकाणची पाहणी करून अर्धवट असलेल्या पुलाचे कामकाज पूर्ण करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.
– भरमा गुडूमकेरी,संतिबस्तवाड
पाणी अडविल्यास पिकांना फायदेशीर
वाघवडे परिसरातील शेतकरी भाजीपाला पिकांसह उसाचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतात. उन्हाळय़ाच्या दिवसात शिवारातील कूपनलिका व विहिरींच्या पाणीसाठय़ात कमतरता जाणवते. अशावेळी उसाला पाणी देणे मुश्किल होते. मुंगेत्री नदीचे पाणी अडविल्यास उसासह विविध पिकांना त्याचा उपयोग होऊ शकतो. ही नदी शेतकऱयांसाठी महत्त्वाची आहे.
– मारुती आंबोळकर, वाघवडे