राजकारणामध्ये एखादी व्यक्ती जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत त्याला चोर म्हणण्याची प्रथा नाही. एकदा जर का ती सापडली तर मात्र त्या व्यक्तीची काही धडगत नाही. एका महिलेने केलेल्या बलात्काराच्या कथित आरोपातून थोडक्मयात विकेट वाचवलेले महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबतीत ही बाब अधोरेखित झाली आहे. राज्यातीलच नव्हे तर देशाच्या राजकारणातील भल्याभल्या मंडळींच्या चारित्र्याच्या बाबतीत राजकीय, प्रशासकीय आणि कंत्राटदार-ठेकेदारांच्या वर्तुळात नेहमीच खुमासदार कुजबुज, चेष्टा सुरू असते. मात्र याला सर्वच जण सहजावरी घेतात. प्रत्येकाचे व्यक्तिगत आयुष्य असते, त्यावर आपण काय बोलणार असा दृष्टिकोन बहुतेक सर्वांचाच असतो. पण जाहीर वाच्यता होते तेव्हा नैतिकतेचा आग्रह धरून राजीनाम्याची मागणी होते! धनंजय मुंडे यांच्याही राजीनाम्याची विरोधी पक्षाने मागणी केली. त्यापूर्वीच खुलासा करताना तक्रारदार महिलेच्या बहिणीशी असलेले संबंध, त्यातून जन्मलेली दोन मुले आणि त्यावर हायकोर्टात सुरू असणाऱया लढाईतून ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचा खुलासाही मुंडेंनी एका दमात करून टाकला. पाठोपाठ भाजपच्या एका नेत्याने आधीची तीन आणि नवी दोन अशी पाच मुले असल्याने निवडणूक आयोगाकडे मुंडे यांना अपात्र करण्यासाठी तक्रारही केली. विशेष म्हणजे यावरून दोन वकिलांचाही वाद झाला. मानवाधिकारांचे मुद्दे घेऊन लढणाऱया वकिलांनी पाच अपत्ये असल्याने त्यांची आमदारकी रद्द होईल असे मत मांडले. तर घटनातज्ञांनी मुंडे यांच्या विवाह आणि मुलांच्या बाबतीतला मुद्दा न्यायालयात सिद्ध व्हायचा आहे त्यामुळे निवडणूक आयोगाला आमदारकी रद्द करता येणार नाही असे मत मांडले. त्याच दरम्यान पक्षाध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी सर्व माहिती खुद्द मुंडे यांच्याकडून जाणून घेतली आणि प्रकरण गंभीर आहे, ते पक्ष सहकाऱयांच्या पुढे मांडून पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले. आता मुंडे अडचणीत आले असे वातावरण तयार झाले. दरम्यानच्या काळात भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे माध्यमांसमोर आले. त्यांनी तक्रारदार महिला आपणासही असेच ब्लॅकमेल करत होती असे माध्यमांना सांगून तिच्याविरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्यापाठोपाठ मनसेचे मनीष धुरी आणि एका वैमानिकानेही तसाच आरोप तक्रारदार महिलेवर केला. या सर्व घडामोडी घडताच राष्ट्रवादीने धनंजय मुंडेंना अभय देऊ केले. मुंबई पोलिसांनी महिलेविरुद्ध तीन तक्रारी आल्याने तातडीने या प्रकरणात मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही असे सूतोवाच केले. महाराष्ट्रातील राजकारण्यांवर हनी ट्रप लावला जात आहे असे मत बनवून आता हे प्रकरण पण केवळ चघळण्यापुरते राहण्याची शक्मयता आहे. सत्तेतील असो की विरोधातील, सर्वच मंडळींची वैयक्तिक सहानुभूती मुंडे यांच्या बाजूने असल्यास नवल नाही. अशाप्रकारे मंत्री, अधिकारी, आमदार, वरि÷ नेते इतकेच नव्हे तर मंत्री, आमदारांचे सहाय्यक, नातलग आणि समाजातील पैसा असणाऱया वर्गाला प्रेमपाशात अडकवून लुटणारा एक वर्ग निश्चित आहे. पण तो निर्माण झाला तोही या व्यवस्थेतच हे लक्षात घेतले पाहिजे. मंत्रालयात मंत्र्यांकडे आणि वरि÷ अधिकाऱयांकडे मंजुरीसाठी येणारी प्रकरणे ही कोटय़वधी रुपयांची असतात. ती मंजूर करायची तर त्यातून काही लाभ मंजूर करणाऱयांनाही मिळालाच पाहिजे म्हणून मग सहाय्यक, नातलग, वरि÷, कनि÷ अधिकारी यांच्यापासून सर्वांना खूष करणारी व्यवस्था निर्माण होते. सर्वांचे ’समाधान’ केवळ पैशात होऊ शकत नाही. त्यातून मग मंत्रालयाच्या जवळपासची तारांकित हॉटेल्स, मंत्र्यांच्या, अधिकाऱयांच्या मित्र-मैत्रिणींच्या फ्लॅटवर असे सर्व प्रकार सुरू होतात. मंत्री, अधिकाऱयांना काय काय लागते याची माहिती असणारी एक व्यवस्था मंत्रालयात कित्येक वर्षांपासून आहे. नवा मंत्री आला की ती माहिती काढणारेसुद्धा उगवतात. कोणतीही राजवट आली तरी ती व्यवस्था उलथून पडलेली नाही. सत्तेचा सौम्य माज आणि मंत्री, अधिकाऱयांच्या डेअरिंगचे दर्शन अशा संबंधातून घडत असल्याने गावापासून, घरापासून लांब असणारी, कार्यकर्ता नागरिकांच्या सततच्या वावरामुळे वैतागलेली ही मंडळी ताण घालवण्यासाठी या मार्गाचे समर्थन करतात. त्याला कुठलाही पक्ष अपवाद नाही. अलीकडच्याच काळात दुसऱया एका राज्यातील आमदार फोडून सत्ता उलथवण्यासाठी एका पक्षाची पदाधिकारी असलेली महिला आणि तिच्याकडे असलेल्या महिलांच्या चमूचा वापर केल्याचा गुन्हा महाराष्ट्रातील एका नवोदित मंत्रीमहोदयांवर दाखल झाला होता. हे विसरून कसे चालेल? तेसुद्धा सापडले म्हणून चोर याच सदरात बसणारे! नातीच्या वयाच्या मुलीशी अश्लील चाळे करणारे महान नेते देशातील अनेक राज्यांच्या राजभवनात आढळून आले आहेत. काहींचे उघडकीस येते, काहींचे येत नाही! विधानमंडळ, मंत्रालय या इमारती जरी लोकशाहीची मंदिरे असली तरी त्या लोकशाहीचे भक्त काही समाजापासून वेगळे नाहीत. या समाजाचाच घटक आहेत. या समाजातील जे काही चांगले आणि वाईट आहे ते त्यांच्यापाशीही मुबलक प्रमाणात आहे. त्यांच्यातील धाडसाने त्यांना नेता आणि व्यभिचारीही बनवले. हीच बाब अधिकाऱयांनाही लागू होते. आपले मंत्रालय मायानगरीत आहे म्हणून असे घडते असे नाही. देशभर सायंकाळचा अत्तराचा दरवळ मंत्रालय आणि त्याच्या आसपास असतोच. चर्चा होते म्हणून हल्ली थंड हवेची ठिकाणे, पंचतारांकित सुविधा असणारी मंदिरासाठी प्रसिद्ध शहरे इथेही हा ‘व्यवहार’ चालतो. धनंजय मुंडे यांच्या निमित्ताने त्यावर चर्चा झाली इतकेच. भाजपचे उपाध्यक्ष, मनसेचे पदाधिकारी आणि पायलेट कुरेशी जर मुंडे यांच्या मदतीला धावले नसते तर राजीनामा अटळ होता. आता राजीनामा न घेताच हे प्रकरण थांबले. कारण ब्लॅकमेल करणाऱयांविषयी लोकांना घृणा असते! आता ते सापडल्याने चोर ठरतात!
Previous Articleफुकटातले पडले महागात…डेटावर व्हाट्सअपचा अधिकार
Next Article पुणे विभागातील 5 लाख 51 हजार 657 रुग्ण कोरोनामुक्त!
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.