जयपूर : विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी येथे झालेल्या इलाईट ड गटातील सामन्यात श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर मुंबईने राजस्थानचा 7 धावांनी पराभव केला. या स्पर्धेतील मुंबई संघाचा हा सलग चौथा विजय आहे. अन्य सामन्यात सौराष्ट्रने चंदीगडचा, सेनादलाने हरियाणाचा, बंगालने जम्मू-काश्मीरचा, पाँडेचेरीने हिमाचलप्रदेशचा, दिल्लीने महाराष्ट्राचा पराभव केला. राजस्थान आणि मुंबई यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने 50 षटकांत 7 बाद 317 धावा जमविल्या. त्यानंतर राजस्थानचा डाव 250 धावांत आटोपला. मुंबईच्या श्रेयस अय्यरने शानदार शतक झळकविताना 116 धावा जमविल्या तर वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने 50 धावांत 4 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
- मुंबई 50 षटकांत 7 बाद 317, राजस्थान सर्वबाद 250
- सौराष्ट्र 50 षटकांत 7 बाद 388, चंदीगड 7 बाद 326
- सेनादल 50 षटकांत 5 बाद 287, हरियाणा सर्वबाद 175
- बंगाल 50 षटकांत 4 बाद 368, जम्मू-काश्मीर सर्वबाद 286
- पाँडेचेरी 50 षटकांत 9 बाद 227, हिमाचल प्रदेश सर्वबाद 123
- दिल्ली 50 षटकांत 7 बाद 330, महाराष्ट्र 7 बाद 328
- नागालँड 50 षटकांत 9 बाद 257, मणीपूर 9 बाद 240
- आसाम 50 षटकांत 6 बाद 249, सिक्कीम सर्वबाद 245
- उत्तराखंड 50 षटकांत 2 बाद 118, मिझोराम सर्वबाद 117 मेघालय 50 षटकांत 2 बाद 157, अरूणाचल प्रदेश सर्वबाद 153.