मुंबई / ऑनलाईन टीम
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या आणि म्यानमार येथून सूरु झालेल्या तौक्ते या चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. याचा तडाखा महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागालाही बसला आहे. याचा फटका मुंबई समुद्र किनाऱ्याला याचा फटका बसला आहे. येथील समुद्रात दोन जहाजं भरकटली असुन या जहाजांवरील ४१० जणांचे प्राण संकटात सापडले आहेत. यांच्या मदतीसाठी आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता या युद्धनौका मदतीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
या आपत्तीग्रस्त दोन नौकांमध्ये अनुक्रमे २७३ आणि १३७ व्यक्ती आहेत. एक बोट मुंबईजवळील बॉम्बे हायच्या समुद्रात तेल उत्खन्नासंदर्भात काम करणारी आहे. तर या नौकेमध्ये अनेकजण कामगार आणि इंजिनियर्स आहेत. या बोटींवरील सर्वांना बाहेर काढण्यासाठी भारतीय नौदलाने आयएनएस कोच्चीच्या मदतीने मोहीम हाती घेतली आहे. सर्च अॅण्ड रेस्क्यू ऑप्रेशनची माहीती नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.