ओटवणे /प्रतिनिधी-
तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी भरवस्तीत शिरून घरे व शेतमांगरांचे नुकसान झालेल्या विलवडे गावातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबई विरार येथील श्री स्वामी समर्थ फाउंडेशन धावून आली. या फाउंडेशनच्या ‘एक हात मदतीचा, एक हात आपुलकीचा’ या सामाजिक उपक्रमांतर्गत या गावातील ४५ पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यासाठी या गावाचे सुपुत्र तथा या फाउंडेशनचे उपाध्यक्ष गोपाळ उर्फ बाळा दळवी यांनी पुढाकार घेतला.
यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष गुरुदास डांगे, कार्याध्यक्ष शिवराम तळेकर, उपाध्यक्ष गोपाळ उर्फ बाळा दळवी, सचिव सखाराम सावंत, सहसचिव महेश परब आदी फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व पूरग्रस्त व उपस्थित मान्यवरांनी मुंबईतून या गावात येऊन जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केल्याबद्दल या फाऊंडेशनचे विशेषतः बाळा दळवी यांचे आभार मानले.
या फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत सरपंच रावजी दळवी, माजी उपसभापती विनायक दळवी, कृष्णा सावंत, माजी सरपंच बाळकृष्ण दळवी, प्रकाश दळवी, सामाजिक कार्यकर्ते सोनू दळवी, परेश धर्णे, प्रमोद दळवी, आत्माराम दळवी, नंदकिशोर दळवी आदींनी गावातील एकूण ४५ पूरग्रस्तांच्या घरोघरी जात या जिवनावश्यक वस्तूंचे वितरण केले.