मुंबई \ ऑनलाईन टीम
मुंबईत लसीकरणासाठी केंद्रांवर प्रचंड गर्दी होते. हे चित्र टाळण्यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
मुंबईकरांसाठी चिंतेचा विषय ठरलेल्या लसीकरण मोहिमेचा वेग काही दिवसांपासून कमी झाला आहे. पालिका, सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रांवर लशींचा तुटवडा निर्माण झाल्याने विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांच्यासोबत चर्चा केली आहे. तसं ट्वीटही त्यांनी केलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, मुंबईत काही ठिकाणी लसीकरण केंद्रावंर होणारी गर्दी आणि मुंबई शहरात ड्राइव्ह इन लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणे यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांच्यासोबत चर्चा केली. यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे लवकरच जाहीर केली जातील.