प्रतिनिधी / रत्नागिरी
वीज पुरवठा खंडित झाल्याने मुंबईत मोठी गडबड उडाली होती. अनेक आस्थापना थबकल्या होत्या. त्याचा परिणाम मंगळवारी रत्नागिरीतही झाला. स्टेट बँकेच्या रत्नागिरी शाखेचे कामकाज १० मिनिटे स्थगित झाले होते. तेवढ्यात शाखेबाहेर लोकांची रांग लागली होती.
बँकेच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, मुंबईत वीज पुरवठा खंडित झाल्याच्या पार्श्वभूमीवर बँकेचा सर्व्हर बंद पडला होता. १० मिनिटात तो सुरू होईल, असे वरिष्ठ कार्यालयाने सांगितले. ग्राहकांना तशी कल्पना देण्यात आली. नंतर बँकेचे कामकाज नियमितपणे सुरू झाले, तोवर बँकेच्या शाखेबाहेर ग्राहकांची रांग लागली होती.