ऑनलाइन टीम / मुंबई :
ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हांच्या नेतृत्वात मुंबईतील गेट वे ते दिल्लीतील राजघाटपर्यंत ‘गांधी शांतता यात्रे’ चे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि जेएनयू हल्ल्याविरोधात ही यात्रा असून, एकतेचा नारा देत या यात्रेची सुरूवात आज मुंबईतून झाली असून या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, वंचित बहूजन आघाडीचे चे नेते प्रकाश आंबेडकर, राष्ट्रवादीचे नवाब मलिक, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आदी दिग्गज नेते सहभागी झाले आहे. सुधारीत नागरिकत्व कायदा, रद्द करण्याची मागणी यावेळी उपस्थित नेत्यांनी केली.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला. केंद्र सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. केंद्र सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजी आहे.नवीन कायदे आणून देशाच्या एकतेला धोका निर्माण केला आहे. आज महात्मा गांधीच्या विचारांवर चालण्याची गरज आहे. संपूर्ण समाजात एकता निर्माण करण्याची गरज आहे, असं ही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, ही यात्रा महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश नंतर हरियाणातूत 30 जानेवारी रोजी दिल्लीतील राजघाट येथे समाप्त होणार आहे. या अंतर्गत तीन हजार किलोमीटर अंतर प्रवास होणार आहे.