ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवेंदिवस वाढतच चालली आहे. मुंबईतील स्थिती चिंताजनक आहे. मागील चोवीस तासात शहर उपनगरात 692 नवे रुग्ण आढळले असल्याने मुंबईत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 11 हजार 394 वर पोहोचली आहे. चोवीस तासात 25 जणांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत एकूण 437 लोकांनी आपला जीव गमावला आहे.
मुंबईत विवध भागात गुरुवारी 538 कोरोना संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर आतापर्यंत 13 हजार 287 रुग्णांची चाचणी करण्यात आली आहे. तर त्यातील 148 रुग्णांना गुरुवारी घरी सोडण्यात आले आहे. तर आत्तापर्यंत एकूण 2 हजार 435 रुग्णांची प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गुरुवारी मृत्य झालेल्या रुग्णांमध्ये 13 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश आहे. यातील 12 जण 60 वर्षांवरील होते. तीन जण 40 वर्षांहून कमी होते तर अन्य दहा जण 40 ते 60 या वयोगटातील होते.
दरम्यान, गुरुवारी महाराष्ट्र राज्यात एकूण 1 हजार 216 रुग्णांची भर पडली असून असून महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 17 हजार 974 वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत 694 लोकांनी आपला जीव गमावला आहे.