ऑनलाइन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच मुंबई शहर सर्वात मोठे हॉटस्पॉट बनले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कठोर निर्णय घेतला आहे.
महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी म्हणाले या निर्णयानुसार, घराबाहेर पडताना मास्क वापरला नाही तर थेट बेड्या ठोकण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडताना मास्क घालणे बंधनकारक झाले आहे. यासाठी चांगला घरघुती मास्क घालण्यास देखील परवानगी दिली आहे.
मात्र, असे न केल्यास थेट हवा खावी लागणार आहे. तसेच कार्यालयीन बैठकांनाही मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी लक्षणीय वाढ पाहून हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आज फेसबुक लाईव्ह द्वारे बोलताना, मास्क घालणे अनिवार्य आहे असे म्हटले होते.