राज्यातील शाळांबाबत आज निर्णय होण्याची शक्यता
ऑनलाईन टीम / नवी मुंबई
राज्यातील कोरोना संसर्गाने रुग्णांची संख्या वेगाने वाढणे वाढत आहे. दिवसें – दिवस आढळणाऱ्या रूग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची बाब दिसून येत आहे. शिवाय, ओमिक्रॉनचे रूग्ण देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून कोरोना निर्बंधासाठी पावले उचलली जात असून, रुग्ण संख्येची स्थिती अशीच राहील्यास निर्बंध कठोर केले जाणार असल्याचं राज्या प्रशासनाने यापुर्वीच स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभुमीवर मुंबईत पहिली ते आठवीचे वर्ग ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
या संदर्भातील झालेल्या बैठकीत आज निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. तसेच नववी ते बारावीच्या शाळा आणि महाविद्यालये लसीकरणासाठी खुली ठेवण्यात येतील असे चहल यांनी सांगितले आहे.कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगर पालिकेने यासंदर्भात निर्णय जाहीर केला आहे.
राज्यातील शाळांबाबत आज निर्णय होण्याची शक्यता
राज्यभरातील शाळांबाबतही आज निर्णय होण्याची शक्यता आहे.वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्यातील कॉलेज सुरू ठेवायचे की ऑनलाइन पद्धतीने चालवायचे याबाबतचा निर्णय दोन ते तीन दिवसांनी परिस्थिती पाहून घेण्यात येणार असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. याबाबत येत्या दोन दिवसांत राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन आढावा घेण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.