प्रतिनिधी/ मुंबई
गवालिया टँक येथील नाना चौकात असलेल्या सचिनम हाईट्स इमारतीस शनिवारी भीषण आग लागली. या दुर्घटनेत सहा रहिवाशांचा दुर्दैवी मफत्यू झाला. तर 16 जण जखमी झाले आहेत. यातील 7 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
मुंबई महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गवालिया टँकमधील 20 मजली कमला इमारतीला सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले होते. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचल्यावर इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागल्याचे समजले. अग्निशमन दलाच्या एकूण 12 बंबांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
उपचाराला नकार देणार्या रूग्णालयावर तात्काळ कारवाई करा ः फडणवीस
या घटनेतील जखमींना मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट, रिलायन्स आणि भायखळा येथील मसिना रुग्णालयाने उपचारांसाठी नकार दिल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. या घटनेवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त करत दुर्घटनेतील जखमींना स्थानिक रुग्णालयांनी दाखल करुन घेण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. याच कारणामुळे मफतांचा आकडा वाढल्याची माहिती आहे. ही गोष्ट खरी असेल तर मुंबई महापालिका आणि राज्य प्रशासनाने याची दख घेत तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडूनही कारवाईचे आदेश
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. आगीत जखमी झालेल्या रुग्णांना काही खासगी रुग्णालयांनी दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या रुग्णालयांची चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.
मफतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची नुकसानभरपाई ः आदित्य ठाकरे
मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी घटनेतील मफतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत केली जाणार असल्याची घोषणा केली आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत लिहिले की, ताडदेव इमारत आग दुर्घटनेत ज्या नागरिकांचा दुर्दैवी मफत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाखांची नुकसान भरपाई दिली जाईल.
पंतप्रधानांची मदतीची घेषणा
मुंबईतील दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतुन मफत्यूमुखी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.