ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईच्या कांदीवली पश्चिम भागातील दलजी पाडा येथे रहिवासी चाळ कोसळली असून, ढिगाऱ्याखाली 4-5 नागरिक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी एनडीआरएफची एक टीम दाखल झाली असून, तीन जणांची ढिगाऱ्याखालून सुटका करण्यात आली आहे.
घटनास्थळी एनडीआरएफच्या टीमचे बचावकार्य सुरू असून, ढिगाऱ्याखाली अजूनही दोन ते तीन लोक अडकल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, सर्च ऑपरेशन सुरू आहे.