ऑनलाईन टीम / मुंबई :
मागील काही दिवसांपासून हिमाचलमध्ये आपल्या परिवारासोबत सुट्टीवर गेलेली अभिनेत्री कंगना रानौत मुंबईत आली आहे. मुंबईत आल्यानंतर आज सकाळी तिने सिध्दी विनायक मंदिरात भेट देत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी कंगनाने मराठमोळी साडी परिधान केली होती.
मंदिराबाहेर येताच कंगनाने ‘जय महाराष्ट्र’ घोषणा दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना कंगना म्हणाली की, मला मुंबईत राहण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही. फक्त गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि परवानगी हवी आहे. ती मिळाली आहे. अजून कोणाकडे मी परवानगी मागितलेली नाही.
पुढे ती म्हणाली, माझ्या लाडक्या मुंबई शहरासाठी उभे राहिल्यानंतर शत्रुत्वाचे प्रमाण आश्चर्यजनक आहे. आज मी मुंबादेवी आणि सिद्धिविनायक मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला. मला सुरक्षित आणि स्वागत केल्यासारखे वाटत आहे.