ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईत गेल्या तासाभरात पासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे.
काल सकाळपासूनच पाऊस सुरू होता. मात्र संध्याकाळी थोडा जोर ओसरला. त्यानंतर आज सकाळपासून पावसाल सुरुवात झाली. तर गेल्या तासाभरापासून दक्षिण मुंबई पावसाचा जोर आणि वादळी वारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतुकीचे अनेक मार्ग देखील बदलण्यात आले आहे.
मुंबई, पालघर, ठाण्यासह पुढील 24 ते 36 तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तसेच आठवड्याच्या अखेरीस पावसाचा जोर ओसरण्यास सुरुवात होईल. परंतु सोमवार मंगळवार पासून पुन्हा पाऊस पडण्यास सुरुवात होईल. परंतु त्या पावसाचा जोर आता पडत असलेल्या पावसाइतका नसेल. तसेच गरज नसल्यास बाहेर पडू नका असे आवाहनही मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, सकाळपासूनच मुंबई उपनगरात जोरदार पाऊस पडला. दहिसर, बोरीवली, मालाड, कांदिवली गोरेगााव अंधेरीमध्ये जोरदार पाऊस झाला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मुसळधार पावसाचा चांगलाच परिणाम झालेला दिसला. जोरदार पावसाने वातावरण इतकं अस्पष्ट झालं होतं की गाडी चालकांना लाईट लावून गाडी चालवावी लागली. पालघरमध्ये रुळावर पाणी साचल्याने लोकल वाहतूक बंद झाली आहे.