ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वडवली गावाजवळ काच वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 3 मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातहून मुंबईच्या दिशेने जात असताना अचानक स्टेरिंग लॉक झाल्याने कंटेनराला मागून धडक जोरात धडक बसली. यामध्ये 3 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जखमींना तलासरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री 3 वाजून 30 मिनिटांच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
अपघात घडताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी अपघात स्थळी धाव घेत 3 जणांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.