मुंबई / वृत्तसंस्था
रणजी क्रिकेटमधील अव्वल मुंबई संघ इलाईट ब गट रणजी चषक स्पर्धेत उत्तर प्रदेशविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर आज मैदानात उतरेल. नियमित कर्णधार सुर्यकुमार यादव व युवा फलंदाज पृथ्वी शॉ सध्या अ संघातून न्यूझीलंड दौऱयावर असल्याने येथे मुंबईला त्यांची गैरहजेरी जाणवेल. श्रेयस अय्यर, अष्टपैलू शिवम दुबे व मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकुर राष्ट्रीय संघातून खेळत असल्याने ते देखील येथे उपलब्ध होणार नाहीत. अर्थात, यापूर्वी अभिनव मुकूंद, दिनेश कार्तिक व रविचंद्रन अश्विन यांचा समावेश असलेल्या तामिळनाडू संघाविरुद्ध तीन गुण संपादन करता आल्याने मुंबईचे मनोबल उंचावलेले असणार आहे.