६ तासांच्या प्रयत्नानंतर ठप्प वाहतूक सुरळीत करण्यात यश
वाहतूक देवधे-आसंगें-लांजा अशी वळविण्यात आली होती
प्रतिनिधी / लांजा
मुंबई-गोवा म्हमामार्गावरून मुंबईच्या दिशेने ४० टन वजनाचा क्रेन घेऊन जाणारा कंटेनर रविवारी सकाळी ९. ३० वाजता लांजा तालुक्यातील वेरळ घाटात पलटी झाल्याने मुंबई-गोवा महामार्गावरी तब्बल ६ तास वाहतून पुर्णतः ठप्प पडली होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. गोवा व मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा अक्षरशः खोळंबा झाला होता.
वेरळ घाटातील यु आकाराच्या वळणावर महामार्गाच्या मध्यभागी कंटेनर कोसळल्याने महामार्गावरी देवधे-आसगे-लांजा अशी वळविण्यात आली होती. सकाळी ९. ३० वाजता कोसळलेला कंटेनर महामार्गावरून दुपारी ३. ३० वाजता ६ तासाने बाजूला करण्यात आला. हातखंबा महामार्ग पोलीस व लांजा पोलिसांचा शर्तीच्या प्रयत्नानंतर दोन क्रेनच्या सहाय्याने महामार्गाच्या मध्यभागी कोसळलेला कंटेनर बाजूला करण्यात यश आले.