प्रतिनिधी/कोल्हापूर
राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यात राज्य सरकार जर वेळकाढूपणा करत असेल तर सरकारला पुरग्रस्तांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल. याबाबत आठवडÎात निर्णय झाला नाही तर मंत्र्यांना भागात फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
तर, भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या हे राजकारणासाठी शेतकऱयांचा वापर करत आहेत. त्यांना जर भ्रष्टाचाराच्या विरोधातच बोलायचेच असेल तर मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचा भ्रष्टाचार बाहेर काढावा, मात्र त्याबाबत हे काहीच बोलत नाहीत, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.
राज्यातील पूरग्रस्त शेतकऱयांच्या राज्य सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संसघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. याबाबत त्यांनी शुक्रवार कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी पूरग्रस्त शेतकऱयांना नुकसान भरपाई राज्य सरकारने तात्काळ द्यावी, अशी मागणी केली. यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलतांना सरकारने लवकरात लवकर पुरग्रस्तांच्या नुकसान भरपाईबाबत निर्णय घेतला पाहिजे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी मराठवाडÎात अजूनही पाऊस पडत आहे. नुकसानीचा अंदाज आला नाही. त्यामुळे आम्ही थांबलो आहोत, अशी ग्वाही दिली आहे. मात्र, याबाबत आठवडÎात निर्णय झाला नाही. तर मंत्र्यांना भागात फिरू देणार नाही. असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
मग शेट्टींनाच गाडीत घेऊन फिरू ः पालकमंत्री पाटील
मंत्र्यांना भागात फिरू देणार नसल्याचा इशाराबाबत पालकमंत्री पाटील यांना पत्रकारांनी विचारले असते त्यांनी मग शेट्टींनाच गाडीत घेऊन आम्ही फिरू, अशी पहिली प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्र्यांनी शब्दा दिला संयम ठेवा
पूरग्रस्त शेतकऱयांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. राज्यात अनेक जिह्यात अजून पाऊस चालू आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची चर्चा सुरू आहे. शेतकयाला नुकसान भरपाई देण्यास कुठंही कमी पडणार नाही. मुख्यमंत्र्यांनी जर शब्द दिला असेल तर राजू शेट्टींनी थांबलं पाहिजे. त्यांनी संयम ठेवावा – सतेज पाटील, पालकमंत्री
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी 127 कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. तर साखर कारखान्यांचा दौराही ते करत आहेत. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना विचारले असता त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या हे स्वतःच्या राजकारणासाठी शेतकऱयांच्या हाताशी धरून विशिष्ट लोकांच्या मागे लागते आहेत. मात्र त्यांनी पक्षीय भेदभाव न मानता त्यांना भ्रष्टाचाराच्या विरोधातच बोलायचे असेल तर त्यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचा भ्रष्टाचार बाहेर काढावा.
दसऱयानंतर ऊस परिषद होणारच ः शेट्टी
ऊस परिषदे विषयी पत्रकारांनी शेटी यांना विचारला असता ते म्हणाले, कोणत्याही स्थितीमध्ये दसऱयानंतर ऊस परिषद होणार आहे.