ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरात शुक्रवारी रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. येत्या 3-4 तासांत मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भासह नाशिक आणि पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे, कल्याण, रायगड परिसर रायगड आणि मुंबईच्या किनारपट्टीवर ढगाळ वातावरण असल्याने येत्या काही तासांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट अखेरीस आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश येथे मुसळधार पावसाची शक्मयता आहे.