बेळगाव/प्रतिनिधी
महाराष्ट्रात कोरोना ग्रंथांची संख्या कमालीची वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सध्यातरी सर्व विमानसेवा 31 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या बेळगाव – मुंबई या विमानसेवेला तूर्तास तरी ब्रेक लागला आहे. मुंबई ते बेळगाव व बेळगाव पुणे ही सेवा सुरू झाल्यास अनेक प्रवाशांना याचा फायदा होणार होता. यासाठी विमान कंपन्यांनी बुकिंगही सुरू केले होते परंतु महाराष्ट्र सरकारने परवानगी न दिल्यामुळे आता ही सेवा 31 मेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचा मात्र हिरमोड झाला आहे. परंतु हैदराबाद अहमदाबाद, बेंगलोर या शहरांना विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.