ओटवणे /प्रतिनिधी-
मुंबई व विरार येथील स्वयंसेवी संघटना त्यांच्या मित्र मंडळाने सुमारे ५५० किलोमीटरचा प्रवास करीत सावंतवाडी तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले. या संस्था व मित्रमंडळानी मिळून विलवडे, बांदा, इन्सुली, वाफोली, माडखोल-धवडकी, व सरमळे या सात गावातील १२० पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले.
सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघटना (विरार), ऊर्जा कुटूंब (नालासोपारा), टाऊन्स आँफ़ कोकण (ठाणे), अनोळखी नाती (विरार-अंधेरी), भीम के दीवाने सामाजिक संघटना यांच्यावतीने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून पूरग्रस्तांना तांदूळ, गहू, तूरडाळ, तेल, रवा, चहा पावडर, बटाटा, कांदा,मुग, शेवया, चणे, कपड्याचे व अंगाचे साबण, मसाला, चादर, टाँवेल, तसेच ४८ गॅस शेगडया आदी जिवनावश्यक व गृहपयोगी वस्तू देण्यात आल्या.
यावेळी मुबंई व विरार येथील ओमप्रकाश नेरुरकर, गौरेश सांडव, अनंत मालवणकर, बाळ वेळकर, विलास सावंत, हर्षाला सावंत, रविंद्र गुरव, शरद जांभळे, अनिल नरे, संतोष नेरुरकर आदी उपस्थित होते. या वितरणासाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश सावंत (बांदा) विलवडे माजी उपसरपंच प्रकाश दळवी, सामाजिक कार्यकर्ते संतोष सावंत (देवसू) आणि स्थानिक ग्रामस्थाचे सहकार्य लाभले. यावेळी पुरग्रस्तांनी सर्वांचे आभार मानले.