ऑनलाईन टीम / मुंबई :
हवामान खात्याकडून मुंबईत 2 आणि 3 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाने धुमाकूळ घालत आहे. जोरदार पावसामुळे सखल भागात नेहमीप्रमाणे पाणी साचल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे.
दरम्यान, दादर माटुंगा वरळी सायन लालबाग कुर्ला अंधेरी या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. संपूर्ण परिसरात पाणी साचल्याने काही अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. गेल्या तीन तासात 156 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
सध्या पावसाचा जोर कायम असून, यात वाढ होणार आहे, तसेच येत्या 24 तासात आणखी पाऊस वाढण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खाते आणि पोलिस प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.