ऑनलाईन टीम/तरुण भारत
मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशी नंतर अटक केली. त्यांनतर त्यांना कोर्टात हजर केलं असता कोर्टाने तीन मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली. ते सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. पण त्यांना झालेली अटक ही बेकायदा असल्याचं सांगत याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आज सुनावणी पार पडली, पण मलिकांना आज दिलासा मिळाला नाही.
मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यांनतर कोर्टाने त्यांना तीन मार्च पर्यंत कोठडी सुनावली आहे. पण मालिकांची अटक बेकायदेशीर असल्याचं म्हणत मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. पण कोर्टाने मालिकांना दिलासा दिला नाही. या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून ७ मार्च रोजी यावर पुढील सुनावणी होणार आहे.