मुंबई/प्रतिनिधी
मु्ख्यमंत्रीसाहेब, आता तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची खरी गरज आहे… ड्रायव्हिंग करत आपण कोकणात जाणार आहात का?, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
दरम्यान आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत मुंबईवरुन पंढरपूरवला गेले होते. त्यामुळे कोकणातील पूरपरिस्थिती पाहता चित्रा वाघ यांनी मु्ख्यमंत्रीसाहेब, आता तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची खरी गरज आहे… ड्रायव्हिंग करत आपण कोकणात जाणार आहात का?, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. कोकणात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. चिपळूणला पाण्याने वेढलं आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बरेच लोक घरामध्ये अडकून पडले आहे. अनेक ठिकाणी पूर आलाय. त्यामुळे गावच्या-गावं पुराच्या पाण्यात अडकलीत, अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने जाणार का? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय.
मुख्यमंत्रीसाहेब, आता तुमच्या कौशल्याची खरी गरज
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विठ्ठल पूजेसाठी स्वत: गाडी चालवत मुंबईवरुन पंढरपूरवला गेले होते. यावेळी त्यांच्या ड्रायव्हिंगवरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीकाही केली. आता संपूर्ण कोकण पुराच्या पाण्यात असताना आणि खऱ्या अर्थाने लोकांना शासनाच्या मदतीची गरज आहे, त्यामुळे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवून कोकणच्या दिशेने जाणार का?, असा खडा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केलाय.
चित्रा वाघ ट्विट
राज्याचे कुटुंबप्रमुख हे स्वत:ची जबाबदारी समजत स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का……खरी गरज आता आहे
तुमच्या driving कौशल्याची मुख्यमंत्री महोदय.. असं ट्विट त्यांनी केलं आहे.
कोकणातल्या नद्यांना पूर, अनेक गावं जलमय
महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग जलमय झाला आहे. कोकणातल्या अनेक नद्यांना पूर आलाय. चिपळूण, महाड, या भागांत पुराच्या पाण्याने थैमान माजवलंय.